नवी दिल्ली :
तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका समग्र शिक्षण योजनेच्या अंतर्गत 2 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी रोखण्यात आल्यासंबंधी आहे. नव्या शिक्षण धोरणाला लागू न केल्याने केंद्र सरकारने निधी जारी केला नसल्याचा आरोप तामिळनाडू सरकारने केला आहे.









