नंदगड : खानापूर-तालगुप्पा रस्त्यावरील झुंजवाड गावाजवळ घालण्यात आलेला गतिरोधक धोकादायक बनला आहे. गेल्या तीन दिवसात दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गतिरोधक काढून टाकावेत किंवा गतिरोधक दिसण्यासाठी त्यावर पांढरे पट्टे ओढावेत, अशी मागणी होत आहे. खानापूर-तालगुप्पा हा बेळगाव-मंगळूरकडे जाणाऱ्या वाहतुकीचा जवळचा व सोयीचा रस्ता मानला जातो. त्यातच खानापूरहून बिडी, कित्तूर, अळणावर, हल्याळ, दांडेली येथे जाणारे अनेक प्रवासी याच रस्त्यावरून जातात. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आले आहेत. गतिरोधकांमुळे भरधाव दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना आपल्या वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे क्रमप्राप्त होते. काही दृष्टीने हे हिताचेही आहे. परंतु अलीकडे याच रस्त्यावरील झुंजवाड गावाजवळ घातलेला गतिरोधक चुकीचा आहे. हा गतिरोधक वाहनधारकांना दिसत नाही. त्यामुळे दुचाकी व चारचाकीधारक भरधाव जात आहेत. परिणामी तेथे असलेल्या गतिरोधकावरून वाहन गेल्याने दुचाकीवर बसलेली महिला वाहनावरून खाली कोसळत आहे. रस्त्यावर पडल्याने त्यांना जबर मार बसत असल्याने जखमी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
Previous Articleवरंधा घाट 3 महिने अवजड वाहतुकीसाठी बंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









