बेळगाव : भाग्यनगर तिसरा क्रॉस येथील गटारीचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. याबाबत अनेकवेळा महानगरपालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गटारीचे पाणी साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत भाग्यनगर येथील रस्ते, गटारी यांचे काम करण्यात आले. तिसरा क्रॉस येथील ही गटार अर्धवट स्थितीत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये गटारी तुडुंब भरत आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून ही समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे.
Previous Articleमंडोळी रोडवरील ‘त्या’ वसाहतीतील समस्या सोडवा
Next Article आरपीडी महाविद्यालयासमोर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









