कोल्हापूर महानगरपालिका हददीतील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या अनु.जाती जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना योजनेची माहिती देवून जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
अनुसुचित जाती व नवबौध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी बाहेरगावी रहावे लागते. पण सर्वच विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहाच्या सुविधेच्या जागेची मर्यांदा लक्षात घेता लाभ देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठया प्रमाणात विद्यार्थी लाभापासून वंचित राहील्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मर्यादा येत आहेत.
यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या रहाण्यासाठी, भोजनासाठी तसेच इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आंमलात आणली आहे. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकिय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती तथा नवबौध्द घटकांतील इयत्ता 11वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हातभार लागणार आहे. या योजनेसाठीच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन पात्र असणारे अर्ज दि.10.11.2023 रोजीपर्यंत या कार्यालयास सादर करण्यात यावेत असे आवाहनही समाजकल्याण आयुक्तांनी केले.
सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष खालीलप्रमाणे आहेत.
विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच तो अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.
सदरच्या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्द व महानगरपालिकेच्या हददीपासून 5 कि.मी च्या परिसरात असलेल्या
महाविद्यालय/ शैक्षणिक संस्था या ठिकाणी प्रवेशित असणाऱ्या व भाडयाने राहत असणाऱ्या (कुटुंबापासून स्वतंत्र) विद्यार्थ्यांसाठी सदरच्या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे.
विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये किमान 50% व दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांना 40 % गुण असणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांची महाविद्यालयामधील उपस्थिती किमान 75% आवश्यक राहिल.








