बेळगाव : शहरातील पाटील गल्ली ते हेमू कलानी चौकापर्यंतच्या गटारी तुंबल्या असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र, महानगरपालिकेकडून गटारींची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शुक्रवारी गल्लीतील दुकानदारांनी स्वत:हून गटारांची स्वच्छता केली. पाटील गल्ली ते हेमू कलानी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, मटण-चिकन दुकाने व इतर व्यापारी अस्थापने देखील आहेत. मात्र, गटारीवर फरशा घालण्याऐवजी अनेक जणांनी काँक्रीट घातले आहे. त्यामुळे गटारांची स्वच्छता करणे अवघड झाले असल्याने गटारी तुंबून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत स्थानिकानी नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर अलीकडेच महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी पाटील गल्लीतील व्यापाऱ्यांना गटारीवरील काँक्रीट हटविण्याबाबत तंबी दिली होती. मात्र, त्यानंतर गटारी स्वच्छ करण्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी दुकानदारांनी स्वत:हून गटारी स्वच्छ केल्या.
Previous Articleअवनी स्पोर्ट्स, साईराज बी. विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









