Sharad Pawar News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर उध्दव ठाकरे चुकले आणि एकनाथ शिंदे वाचले अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येतेय. उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं. दरम्यान, यावर शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की,उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा पुस्तकात मांडलाय.याबद्दल काही नेते नाराज आहेत. पण झालं ते झालं आम्ही तिन्ही पक्ष मिळून काम करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. कोर्टाच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती. राज्यकर्त्यांविरोधात कोर्टाने तीव्र भूमिका मांडली. ज्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवतात त्या पक्षाची भूमिका महत्त्वाची असते.नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे असं वाटत नाही. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय येणं अद्याप बाकी आहे.सत्येचा गैरवापर सातत्यानं सुरु आहे. काही निर्णय अजून बाकी आहेत. अध्यक्षांना नियमांच्या चौकटीत काम करावं लागतं. आता विरोधकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








