बेळगाव : पावसाचे आणि सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले असल्याने भाग्यनगर, अनगोळ परिसरात गटारीऐवजी पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे सांडपाण्यातूनच वाहनचालक आणि रहिवाशांना ये-जा करण्याची वेळ आली आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी देखील पसरली असल्याने महापालिकेने याकडे लक्ष देऊन पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे. भाग्यनगर, अनगोळ ही उच्चभ्रू वसती म्हणून ओळखली जाते. मात्र, त्याच ठिकाणी नागरी सोयीसुविधांपासून नागरिकांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारींची सफाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. गटारीत अडथळे निर्माण झाले असल्याने भाग्यनगर परिसरात पाऊस व गटारीतील सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे.गेल्या काही दिवसांपासून ही समस्या असली तरी त्याकडे स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेने मात्र दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच वाट शोधत ये-जा करण्याची वेळ आली आहे.
Previous Articleसरपंचपदासाठी आज आरक्षण सोडत
Next Article सेवा रस्त्यांची दुर्दशा, अपघातांचा धोका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









