रत्नागिरी :
कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेत विनापरवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्या सात जणांना न्यायालयाने 1 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी दंड न भरल्यास 1 महिना कारावास असे शिक्षेचे स्वऊप आह़े भारतीय रेल्वे कायदा कलम 144 (1) नुसार आरोपींविऊद्ध गुन्हा दाखल कऊन न्यायालयापुढे हजर करण्यात आले होत़े रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायालयाने हा शिक्षेचा निकाल दिल़ा.
गुलाबसिंह रामानंद, विकास सिंह, सतेंद्र सिंह, आशिष ब्रज किशोर, मेराज शाह, भारत सिंह व राजेश सिंह अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़ आरोपी हे कोकण रेल्वे मार्गावरील गाडीमध्ये विनापरवाना खाद्यपदार्थ विकत असल्याचे पोलिसांना आढळून आले होत़े त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा तसेच न्यायालयापुढे त्यांना हजर करण्यात आल़े
न्यायालयापुढे आरोपी यांनी आपला गुन्हा कबूल केल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 252 नुसार व आरोपोनी स्वच्छेने दिलेल्या गुह्याच्या कबुलीनुसार भारतीय रेल्वे कायदा कलम 144 (1) नुसार दोषी असल्याचा निकाल दिल़ा तसेच 1 हजार 500 ऊपय दंडाची शिक्षा ठोठावण्यात आल़ी








