मोरजी : घटनेने प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा मूलभूत अधिकार बहाल केला असला तरी आत्मसंरक्षणासाठी प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सनातनचे हर्षद खानविलकर यांनी केले. कोरगाव येथील श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘स्वसंरक्षण’ विषयावरील प्रशिक्षण शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव नीळकंठ थळी, प्राचार्य जुही थळी उपस्थित होत्या. यावेळी हर्षद खानविलकर म्हणाले की, आज देशात दर 16 मिनिटाला कुणावर तरी अत्याचार होत असतो. या अत्याचाराविऊद्ध लढण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रत्येकाने घ्यायलाच हवे. हे प्रशिक्षण विद्यार्थी दशेत घेतल्यास आयुष्यभर उपयोगी पडेल. शिवाजी महाराजांनी स्वसंरक्षणाचा वापर करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. प्रशिक्षणातून आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वासच यशाकडे नेतो. प्रतिकार शक्ती वाढवितो, असे ते म्हणाले. यावेळी श्री. खानविलकर यांनी आत्मसंरक्षण विषयावर ध्वनी चित्रफित दाखविल्या तसेच प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सचिव नीळकंठ थळी यांनी प्रास्ताविक केले. आसावरी शेट्यो व निशा च्यारी यांनी मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विठोबा बगळी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य जुही थळी यांनी आभार मानले.
Previous Articleकॅन्सरसारखे रोग बरे करण्याची आयुर्वेदात क्षमता
Next Article शाळांमधून प्रथमोपचार प्रशिक्षणाची गरज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









