बेळगाव : आसाममध्ये गरीब व मुस्लीम बांधवांवर अत्याचार होत आहेत. त्यांची घरे जेसीबीने हटवून त्यांना बेघर करण्यात येत असून समुदायाला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. विनाकारण समाज बांधवांना त्रास देण्यात येत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. याच्या निषेधार्थ एसडीपीआयतर्फे राणी चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आली. आसाम राज्य सरकारकडून मुस्लीम समुदायाला लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. समाज बांधवांना नाहक त्रास देण्यात आहे. शेकडो कुटुंबीयांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. याचा निषेध करत असून आसाम सरकारने सदर अन्याय तातडीने थांबविण्याची मागणीही करण्यात आली.
Previous Articleनवी गल्ली-गणेशपूर गल्ली कॉर्नरवर नव्या सीडी कामाची सुरुवात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









