सावंतवाडी प्रतिनिधी
रानकवी साहित्यिक ना . धो. महानोर यांना कोकणातील सावंतवाडीतील सुंदरवाडी अनुभवायची होती, पाहायची होती. पण, हे त्यांचे स्वप्न शेवटपर्यंत पूर्ण झालेच नाही. त्यांनी सर्वप्रथम माजी आमदार जयानंद मटकर यांच्याकडे ही इच्छा कित्येक वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती . आणि त्यानंतर आत्ता आत्ता अनेक साहित्यिक कवींकडेही त्यांनी मला सुंदरवाडी पाहायची आहे असं बोलूनही दाखवलं होतं. एवढं सुंदरवाडीवरचे प्रेम एका महान कवी साहित्यिकाला होते. त्यांच्या जाण्याने केवळ निसर्गच पोरका झाला आहे असे नव्हे तर अवघी मानवताच पोरकी झाली आहे. अशा शब्दात इतिहासकार साहित्यिक जी. ए . बुवा यांनी शोक व्यक्त केला. सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद व सावंतवाडी शाखा च्या वतीने कवी ना धो महानोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी गणित तज्ञ लेखिका मंगलाताई नारळीकर ,निर्माते दिग्दर्शक नितीन देसाई, माजी खासदार तथा साहित्यिक ॲड बापूसाहेब परुळेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आयोजित करण्यात हॉटेल मँगो २ येते कवी महानोर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड संतोष सावंत यांनी शेतीशी मातीशी नाळ असलेले साहित्यिक कवी महानोर यांच्या जाण्याने साहित्य चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य निघावे कोणती पुण्य अशी येथील फळाला आणि माझ्या पापणीला पूर यावे अशा शब्दात शोक व्यक्त केला . यावेळी मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा खजिनदार भरत गावडे , जिल्हा सचिव विठ्ठल कदम तालुका सहसचिव राजू तावडे ,सदस्य प्राध्यापक रुपेश पाटील, शंकर प्रभू यांनी एक महान साहित्यिक राजकर्ते आणि ज्यांना शेतीबद्दल अफाट प्रेम होते असे कवी महानोर यांनी साहित्य चळवळ जिवंत ठेवली ते एक महान साहित्यिकच नव्हे तर शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी जो त्याग दिला तो खरच महान आहे अशा शब्दात शोक व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे .,मेघना राऊळ, रामदास पारकर ,प्रदीप प्रियोळकर ,बालकवी मनोहर परब ,विनायक गावस आदी उपस्थित होते .
Previous Articleशिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी शैलजा दराडे यांना अटक
Next Article लंपी आजारामुळे कोलझर येथे दुभती गाय दगावली !









