कडोली : मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने कडोली येथे नादुरुस्त गटारीमुळे घराघरातून पाणी शिरले होते. त्यामुळे गटार दुरुस्तीचे काम ग्राम पंचायतीने तातडीने हाती घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत कडोली परिसरात ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. लहान मोठे सर्व नाले दुथडी भरुन वाहत होते. गटारीतून पाणी ओसंडून वाहत होते. गावच्या उत्तरेकडील पेठ गल्लीतील, जोतिबा मंदिरापासून गौरी नाल्याकडे जाणारी गटार केरकचरा आणि मातीने भरली होती. त्यामुळे पावसाने पाण्याचा मोठा प्रवाह प्रमुख रस्त्यावरुन वाहत होता. सदर रस्ता ओलांडून पाणी घरामध्ये शिरले. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. दैनिक ‘तरुण भारत’मध्ये सविस्तर वृत्त देण्यात आले होते. याची दखल घेवून कडोली ग्राम पंचायतीने जेसीबीद्वारे गटारी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तेथील ग्रामस्थ ही गटार दुरुस्त करावी, अशी मागणी करत होते. पण याकडे दुर्लक्ष केले जात होते. पण कालच्या ढगफुटीसदृश पावसाच्या तडाख्याने ग्रामपंचायतीलाही जाग आली आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले.
Previous Articleमित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









