Satej Patil News : गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस आयुक्तालय कोल्हापुरात व्हावे अशी आमची मागणी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पाच जिल्ह्यांचा रेंज ऑफिस पुण्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. हे गेल्यावेळी आमचं सरकार असताना आम्ही होऊ दिलं नाही. मात्र आता आमचं सरकार गेल्यानंतर जागा चाचणीसाठीचे पत्र विभागीय आयुक्तांना गेल्याची माहिती समोर आली आहे.सरकारने मध्यस्थी करून हे थांबवला पाहिजे.सरकारी अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी असे करणे योग्य नाही. वेळ पडली तर आम्ही सर्व आमदार मिळून सरकारला पत्र लिहून हे ऑफिस न हलवण्याची विनंती करू अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी दिली. आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या काही वर्षात केंद्रातल्या सरकारचं दबावाचं आणि टारगेट करून होत असलेल राजकारण याला विरोध झाला पाहिजे. देशातील राजकारण वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. महागाई आणि बेरोजगारीवर सरकार बोलत नाही ही लोकशाही आहे आणि लोकांना न्याय देणं गरजेचं आहे. सर्व विरोधी पक्ष समर्पक अशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचा आनंद आम्हाला आहे. आमची ही आघाडी भक्कम होईल याचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
भाजपचं देशात विखारी राजकारण सुरू
भाजप प्रवेशा संदर्भात बोलताना सतेज पाटील म्हणाले की, 2014 मध्ये ज्यांना भाजपमध्ये जायचं होतं ते गेलेले आहेत आता कोणाला जायची इच्छा नाही. कोल्हापुरात जुन्या भाजपच्या नेत्यांवर नवीन लोक डोक्यावर येऊन बसले आहेत अजून आणखी बसवणार आहेत का माहित नाही. आमच्यातले कोणीही भाजपमध्ये जाणार नाही.कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र मिळून काम करत आहे यामुळे बाहेर कोण जाईल असं वाटत नाही.
भाजपमध्ये गेलेल्या लोकांची परिस्थिती काय आहे हे सर्वांना दिसत आहे. प्रमुख नेत्यांना डीपीमध्ये पद दिलं जात आहे. यावरून भाजप त्यांचा किती सन्मान करते हे दिसून येत आहे. जुन्या भाजपच्या लोकांना माहित आहे की नवीन लोकांनी सर्व ताब्यात घेतला आहे. यामुळे आणखी ना घेऊन जुन्याना पूर्णच बाजूला जायचं आहे का? असा सवालही यावेळी केला. भाजपचं देशात विखारी राजकारण सुरू आहे. प्रत्येक राज्यातील काही मतभेद असतील ते सर्व दूर करू. भाजपने सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत असं जे वातावरण तयार केलं होतं त्याला कुठेतरी छेद करण्यात आला आहे. छोटे मोठे जे काही गैरसमज असतील ते लवकरच निघून जातील. भाजपमध्ये जी घराणेशाही आहे त्याची आकडेवारी समोर आली आहे. मुद्दा नसल्यामुळे विषयांतर करायचं काम भाजप करत असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला आहे.
सिध्दरामय्यांना कोल्हापूरसाठी आमंत्रित करणार
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे रविवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांना लवकरच कोल्हापूरसाठी देखील आमंत्रित करणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. सिद्धरामय्या हे धनगर समाजाचं नेतृत्व म्हणून समोर आले आहेत.केंद्र सरकारने कोल्हापूर विमानतळाला अद्याप छत्रपती राजाराम महाराज विमानतळ नाव देण्याचा निर्णय घेतला का माहित नाही.मात्र सिद्धारामय्या यांनी त्यांच्या दौऱ्यात कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे उल्लेख केल्याने याचा आम्हाला अभिमान असल्याचे पाटील म्हणाले.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले की, हा त्यांचा प्रशासकीय विषय होता. त्याला राजकीय घेण्यात काही अर्थ नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात आहे आणि त्यातून काहीतरी काढणे हे संयुक्तिक ठरणार नसल्याचे ते म्हणाले.
पक्षाला डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे
पक्ष म्हणून पक्षाची भूमिका वरिष्ठ मंडळी घेत असतात. अनेक सर्वे समोर येत आहेत ज्यामध्ये काँग्रेसचा टका वाढलेला दिसत आहे. म्हणून काँग्रेसमध्ये काय चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत का असे दाखवून देत पक्षाला डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष संदर्भात जो काही निर्णय असेल तो वेळ आल्यावर येईल.महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणणे हे आमचं टार्गेट आहे.पहिल्यांदा सर्व विरोधी पक्ष एकत्र आले हे महत्त्वाचं असल्याचे ते म्हणाले.








