बेळगाव : एसआरएस हिंदुस्थान आयोजित अनगोळ मर्यादीत क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने राजहंस गल्लीचा राजाचा 9 गड्यांनी पराभव करून आरजीपीएल चषक पटकाविला. या सामन्यात राजहंस गल्लीचा राजा संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 3 गडी बाद 29 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थान संघाने 3 षटकात 1 गडी बाद 30 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. अंतिम सामन्याचा सामनावीर उमेश कुऱ्याळकर, उत्कृष्ट गोलंदाज गजानन हसबे, उत्कृष्ट फलंदाज ओमकार जाधव, उगवता खेळाडू नागेश सोमण्णाचे, मालिकावीर उमेश कुऱ्याळकर यांने एकूण 131 धावा व 6 गडी बाद करत मालिकावीर चा मानकरी ठरला. बक्षीस वितरण मनोज चवरे, राजू मुधोळकर, रवी येळ्ळूरकर, बाळू कुऱ्याळकर, संदीप मुधोळकर, मल्लाप्पा होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
Previous Articleदिव्यांग खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









