मोर्चाद्वारे बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी वकीलपदासाठी परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, या परीक्षा नियमानुसार आणि शिस्तबद्धरीत्या पार पडल्या नाहीत. चुकीच्या पद्धतीने या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. तेव्हा तातडीने पुन्हा परीक्षा घ्याव्यात, या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशन आणि वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
संपूर्ण राज्यातील विविध न्यायालयांमध्ये सरकारी वकील पदे रिक्त आहेत. त्या पदांवर नियुक्ती करण्यासाठी अनेक उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका योग्यप्रकारे जोडून देण्यात आली नाही. केवळ या दोन्हीला एक टाचण मारून देण्यात आली होती. त्यामुळे उत्तरपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका गहाळ होऊ शकते. तेव्हा ही पद्धत चुकीची आहे. तेव्हा पुन्हा या परीक्षा घ्याव्यात, या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले.
या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत अनेक चुका आहेत. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा देणे कठीण झाले. याचा सारासार गांभिर्याने विचार करून तातडीने ही परीक्षा रद्द करा, असेही निवेदनात म्हटले आहे. तेव्हा पुन्हा परीक्षा घ्या, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी, जनरल सेपेटरी गिरीराज पाटील, सदस्य ऍड. इरफान बयाळ, ऍड. सुनील काकतकर यांच्यासह वकील मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









