बेळगाव : 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी एलअँडटीकडून खोदकाम करण्यात आल्याने गवळी गल्लीत चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसात खोदकाम हाती घेतल्याने रहिवाशांना त्याचा फटका बसत असून चिखलामुळे निसरड झाली आहे. त्याचबरोबर या गल्लीतून ये-जा करणे आता कठीण झाले आहे. एलअँडटीकडून शहरात जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गवळी गल्लीत खोदकाम करून पाईपलाईन घातली जात आहे. मात्र, झालेल्या मुसळधार पावसामुळे चिखल निर्माण झाला असून नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले आहे. पाईप घातल्यानंतर तातडीने चर बुजविण्याऐवजी खोदलेली माती तशीच रस्त्याकडेला ढीग मारून ठेवली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला असल्याने या कामाचा फटका रहिवाशांना सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने सदर काम पूर्ण करण्यात यावे.
Previous Articleसंभाजी उद्यानासमोरील कचऱ्याची उचल करा
Next Article मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









