बेळगाव : वडगाव भागातील सप्पार आणि तेग्गीन गल्ली येथे कचऱ्यामुळे गटारी तुंबल्या आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून गटारींची स्वच्छता करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असल्याने तातडीने परिसर स्वच्छ करण्यात यावा, या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. सप्पार गल्ली आणि तेग्गीन गल्लीच्यामधील अरुंद रस्त्यावर स्वच्छतेचा अभाव आहे. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. कचरा गटारीत टाकला जात असल्याने गटारी तुंबल्या आहेत. मात्र, कचरा काढण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा उपद्रवही वाढला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या ठिकाणच्या गटारीचे काम अर्धवट झाले असून पंधरा दिवसातून एकदा गटारीतील कचरा काढला जात आहे. त्यामुळे स्वच्छता नसते. स्थानिक नगरसेविकांना अनेक वेळा तक्रारी सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणे देखील आता कठीण झाले आहे, असा आरोपही उपस्थितांनी केला. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून समस्या सोडविण्याची सूचना करावी, अशी मागणी महिलांनी केली.
Previous Articleचैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक
Next Article खरीपसाठी 80 लाख हेक्टरात पेरणीचे उद्दिष्ट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









