बेळगाव : प्रभाग क्र. 27 मधील पवार गल्ली, शहापूरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. गटारीही अर्धवट आहेत. तेव्हा त्याचीही दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या समस्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यांनीही अद्याप दखल घेतली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध रस्त्यांचे तसेच गटारींचे काम शहरामध्ये करण्यात आले. मात्र, शहापूर येथील या गल्लीकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून आहे. त्यामधून वाहने चालविणे कसरतीचे ठरत आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी ये-जा करणे अवघड आहे. महत्त्वाचे म्हणजे पथदीपही बऱ्याचवेळा बंद असतात. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
Previous Articleगटारी साफ करण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांची कसरत
Next Article जीर्ण झालेल्या घरांचा प्रश्न ऐरणीवर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









