बेळगाव : वडगाव-यरमाळ रोडवरील एक वृक्ष धोकादायक स्थितीत आहे. हा वृक्ष जीर्ण झाला असून केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी तसेच शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून वनविभागाने तात्काळ हा वृक्ष हटवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वडगाव शहरानजीक रहिवासी वसाहतीजवळच धोकादायक वृक्ष आहे. सध्या वारा-पावसामुळे हा वृक्ष एका बाजूला कलंडत चालला आहे. एखाद्यावेळी हा वृक्ष कोसळण्याची शक्यता आहे. ये-जा करणारे नागरिक तसेच शेतकऱ्यांवर कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यापूर्वी वनविभागाने हा वृक्ष हटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. वृक्ष न हटविल्यास वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Next Article आंदोलनाचा इशारा देताच अधिकाऱ्यांना जाग
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









