बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ यांची प्रचारफेरी शिवबसवनगर परिसरात काढण्यात आली. त्यावेळी येथील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. शिवबसवनगरचे रहिवासी भारतातील विविध भागात नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निवारण करणे आमचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी विधानसभेत पाठवा, असे आवाहन राजू सेठ यांनी रहिवाशांना केले. शिवबसवनगर तसेच विविध परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी माजी आमदार फिरोझ सेठ यांनी राजू सेठ यांना मतदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. मागील पाच वर्षात उत्तर मतदार संघातील विकासकामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे रहिवाशांना समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे आपण लवकरच निवारण करू, असे सांगत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवबसवनगर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleमजगाव-अनगोळ परिसरात प्रभावती मास्तमर्डींना पाठिंबा
Next Article भवानीनगर परिसरात समितीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









