बेळगाव : उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ ऊर्फ राजू सेठ यांनी आतापर्यंत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. समर्थनगर तसेच कामत गल्ली परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. मागील कित्येक वर्षांपासून समर्थनगर परिसराचा विकास खुंटला आहे. अनेक परिसरात विकासकामे झाली नसल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, यापुढे काँग्रेसची सत्ता येणार असून नागरिकांच्या सर्व समस्यांचे निवारण केले जाईल. केवळ नागरी सुविधा नाही तर नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन घरकुल योजना, महिलांसाठी मोफत बस सुविधा, त्याचप्रमाणे 24 तास पाणी योजना व विकासकामे राबविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. याकरिता आपले बहुमोल मत आवश्यक आहे. आपल्या मतदारसंघातील समस्यांचे निवारण करण्याची संधी द्यावी. त्याकरिता येत्या विधानसभा निवडणुकीत मला आपले बहुमोल मत देऊन निवडून द्यावे, असे आवाहन राजू सेठ यांनी केले. कामत गल्ली आणि समर्थनगर परिसरात राजू सेठ यांचे स्वागत करण्यात आले. येत्या निवडणुकीत येथील जनता पाठीशी आहे. बहुमोल मत देऊन निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
Previous Articleलक्ष्मी हेब्बाळकर यांचा सुळेभावी भागात जोरदार प्रचार
Next Article अॅड.येळ्ळूरकरांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









