रत्नागिरी :
रत्नागिरी शहरात दोन ठिकाणी दुधामध्ये भेसळ करून ते घरोघरी विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत समोर आला आह़े बंद पिशवीतील दूध काढून त्यामध्ये पाणी मिसळून हे दूध गवळींच्या माध्यमातून गोठ्यातील गायीचे दूध असल्याचे सांगून विक्री करण्यात येत होत़ी याप्रकरणी अन्न सुरक्षा विभागाकडून दोन्ही दूध विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आह़े
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याची तक्रार अन्न सुरक्षा विभागाकडे आली होत़ी त्यानुसार शहर व लगतच्या परिसरात दूध विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत होत़ी काही ग्राहकांना पिशवीबंद दुधाऐवजी घरच्या गायीचे दूध पाहिजे असल्याने घरोघरी सकाळी फिरणाऱ्या गवळींकडून दूध घेणे पसंत केले जात़े या गवळींवर नजर ठेवली असता ते माऊती मंदिर परिसरातून बाहेर पडत असल्याचे आढळून आल़े
अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पाहणी केली असता हे गवळी पिशवीबंद दुधाच्या पिशव्या फोडून ते दूध एका कॅनमध्ये भरत असल्याचे दिसून आल़े तसेच या दुधामध्ये पाणी मिसळून या दुधाची घरोघरी विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात होत़ी. अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी अधिक तपास केला असता अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे उघड झाल़े त्यानुसार माऊती मंदिर परिसरातील या दोन्ही ठिकाणावर अन्न सुरक्षा विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मागील अनेक दिवसांपासून या भेसळयुक्त दूध पुरविणाऱ्यांविऊद्ध अन्न सुरक्षा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत होत़ा अखेर एका ग्राहकाकडून आलेल्या तक्रारीनंतर अन्न सुरक्षा विभागाकडून पाळत ठेवण्यात आली होत़ी यामध्ये घरोघरी दूधविक्री करणारे गवळी दूध कोठून आणतात, त्यांच्या दिनक्रमावर लक्ष ठेवण्यात आला. यानंतर हा सर्व भेसळीचा प्रकार समोर आल़ा ही कारवाई अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचुपुते यांनी केल़ी
- एकदा तरी दूध पुरवण्यात येणाऱ्या ठिकाणी भेट द्या!
भेसळयुक्त दुधाबाबत ग्राहकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. गोठ्यातील गायीचे काढलेले दूध हे थोडेसे कोमट असत़े त्यामुळे घरी आलेले दूध अति थंड जाणवत असल्यास ते पिशवीतील असू शकत़े अधिक सुरक्षेसाठी आपणाला दुधाचा पुरवठा करणाऱ्या गवळीच्या गोठ्याला भेट द्या. त्याच्याकडे असणाऱ्या गायी अथवा म्हशी दूध देणाऱ्या आहेत का, याची चौकशी केल्यास फसवणूक टाळणे शक्य होईल, असे रत्नागिरी अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी सांगितले.








