नावेली : आई हे फक्त नाव असले तरी घरातील ते गजबजलेले गाव असते. या छोट्याशा वाक्यात आई या शब्दाचा जणू मर्मबंधच उलगडवून दाखवला आहे. ‘आई’ या शब्दांत ओतप्रोत भरलेले वात्सल्य, प्रेम, ममता, माया, महती जाणून घेण्यासाठी मर्मदृष्टी असावी लागते. अशी मर्मदृष्टी असलेल्यानांच हा भावार्थ समजतो. आणि हा भावार्थ कवयित्री पुष्पा ताई गायतोंडे यांच्या ‘महती माता मायभूची’ या काव्यसंग्रहात जाणवतो. असे उद्गार साहित्यिक तथा पत्रकार कविता आमोणकर यांनी पुष्पा गायतोंडे यांच्या ‘महती माता मायभूची’ या काव्यसंग्राहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले. आके मडगाव येथील गायतोंडे वाचनालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर साहित्यिक मेघना कुरुंदवाडकर, ज्येष्ठ अतिरिक्त मुख्य अभियंता जलसंचालनालय व समाजसेवक उल्हास गायतोंडे, लेखिका पुष्पा गायतोंडे आणि प्रमोद गायतोंडे यांची उपस्थति होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास गायतोंडे यांनी कवयित्रीचे कौतुक करताना या काव्यसंग्रहातील कविता बालकांना मार्गदर्शन करणाऱ्या आहेत, असे सांगितले. सारस्वत समाज चे सचिव नारायण प्रभू गांवकर, शिक्षिका सविता नाईक व गायत्री केळकर यांनी यावेळेस कवयित्रीचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा बाळे यांनी केले. सुरुवातीला ईशस्तवन व गीते गाऊन उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. आभार पुष्पा गायतोंडे यांनी मानले.
Previous Articleराष्ट्रीय ध्रुवीय,महासागर संशोधन केंद्राचा आज स्थापना दिन
Next Article कॅन्सरसारखे रोग बरे करण्याची आयुर्वेदात क्षमता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









