बेळगाव : सध्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: विमानतळ, रेल्वे स्थानकांना याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे बेळगाव विमानतळ प्राधिकरणाने नुकत्याच एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. बेळगाव शहर पोलीस विभाग व विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. मागील काही वर्षात सायबर गुन्ह्यांची संख्या कमालीची वाढली आहे. कोणतीही वेबसाईट हॅक करून गुन्हे घडविण्याचे काम सायबर क्राईमद्वारे करण्यात येत आहे. मध्यंतरी, भारत-पाकिस्तान तणावाच्या स्थितीत विमानतळांना सायबर गुन्हेगारांचा धोका असल्याने अलर्ट देण्यात आला होता. अशा परिस्थितीत काम करताना खबरदारी घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विमानतळ संचालक त्यागराज यांनी पोलीस पथकाचे स्वागत केले. राज्य पोलीस विभागाच्यावतीने सायबर सिक्युरिटीवर सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विमानतळाचे अधिकारी व पोलीस उपस्थित होते.
Previous Articleरुक्मिणीनगर येथे कूपनलिकेची खोदाई
Next Article राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









