मंडला : काँग्रेस महासचिव प्रियांका वड्रा यांनी गुरुवारी मध्यप्रदेशातील मंडला येथे जनआक्रोश सभेला संबोधित पेले आहे. देशाची, राज्याची, जिल्ह्याची संपत्ती लोकांच्या हातात रहावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. परंतु भाजप सरकारच्या काळात मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असल्याने लोक येथून पलायन करत असल्याची टीका प्रियांका वड्रा यांनी केली आहे. भाजपकडून लूट सुरू असल्याने लोक रोजगारासाठी राज्यातून बाहेर पडत आहेत. भाजपने राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकडे घोर दुर्लक्ष केले आहे. भाजप 18 वर्षांपासून राज्यात सत्तेवर आहे, परंतु रोजगाराच्या संधी निर्माण न करता भाजप केवळ लूटण्यात व्यग्र आहे. राज्यात सर्वच क्षेत्रांमध्ये घोटाळे झाले आहेत असा आरोप प्रियांका वड्रा यांनी केला आहे. काँग्रेसने जनतेला अधिकार देत सशक्त करण्याचे काम केले होते. परंतु भाजपने सत्तेवर येताच हे अधिकार हिरावून घेतले आहेत. गावांमध्ये रोजगार मिळत नसल्याने लोकांचे पलायन वाढले आहे. लोकांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांना पिकांसाठी योग्य भाव दिला जात नाही. लोक आंदोलन करू लागल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जात असल्याचा दावा प्रियांका यांनी केला.
Previous Articleपंजाबमध्ये हेरॉईनसह 5 कोटींची रोकड जप्त
Next Article कॅनडा जी-20 परिषदेला अनुपस्थित राहणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









