उचगाव : अतिवाड अप्रोच रोड या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी अतिवाड ग्रामस्थांनी केली आहे. बेकिनकेरे ते कर्नाटक, महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या या अतिवाड अप्रोच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गावांमध्ये ये-जा करण्यासाठी सदर रस्ता महत्त्वाचा आहे. रस्त्यामध्ये मोठ मोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे कठीण झाले आहे. जंगलातून हा रस्ता जात असल्याने जंगली जनावरांचाही या मार्गावर सातत्याने वावर असतो. त्यामुळे येथे भीतीचे वातावरण असते. यासाठी तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. सध्या पावसाळा संपत आला असला तरी येथून पुढे धुळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याचा प्रवासी वर्गांला त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे या खड्ड्यातून पाणी साचल्याने रात्रीच्या अंधारात खड्ड्यांचा आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे. अनेकांची वाहने नादुरुस्त होत असून छोटे-मोठे अपघातही या खड्ड्यामुळे होत आहेत. यासाठी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Previous Articleराजहंसगड येथे बालकलाकारांनी साकारली प्रतापगडाची प्रतिकृती
Next Article गुंजी ग्रामपंचायतची कचरागाडी आठवड्यापासून बंदच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









