बेळगाव : शहराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष केंद्रित केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी विविध ठिकाणी कचऱ्याची समस्या मात्र अद्याप जैसे थे आहे. शहरापासून लगत असलेल्या नानावाडी रोडवर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडले असलेतरी त्याची उचल करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ आली आहे. स्वच्छ व सुंदर बेळगाव करण्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण झालेले नाही. घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी स्मार्ट सिटी 2 योजनेतून बेळगाव शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. मात्र कचऱ्याचे वेळेत उचल होत नसल्याने बहुतांश ठिकाणी मिनी कचरा डेपो निर्माण झाले आहेत. कचऱ्यामुळे मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचे कळप वावरत आहेत. विशेष करून खानापूर रोडपासून काही अंतरावर असलेल्या नानावाडी क्रॉसवर मोठ्या प्रमाणात ओला, सुका व प्लास्टिक कचरा तसाच पडून आहे. पण त्याची वेळेत उचल करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Previous Articleयुवकांकडून गोशाळेला पशुखाद्याचे वितरण
Next Article सर्वसामान्यांना न्याय देण्यास राज्य सरकार अपयशी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









