पणजी : गोव्यातील 90 टक्के गुह्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश व छत्तीसगड सारख्या राज्यांतील माणसे गुंतल्याचा संशय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केल्यानंतर बिहारमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले असून पाटणा येथील न्यायालयात सावंत यांच्या विरोधात याचिका सादर करण्यात आली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढते गुन्हे याबाबत चिंता व्यक्त करून हे गुन्हे गोव्यातील नागरिकांकडून होत नाही तर गोव्यात येणाऱ्या बाहेरील राज्यातील व्यक्तींकडून होत आहेत. तब्बल 90 टक्के गुन्हे हे गोव्याबाहेरील व्यक्तींकडून होत आहेत. त्यात बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आधी राज्यातील मंडळी अग्रेसर आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले होते. त्याचे तीव्र पडसाद बिहारमध्ये उमटले असून बिहारमधील सत्ताधारी जनता दल यु चे नेते मनिशकुमार सिंग यांनी तेथील न्यायालयात ही याचिका सादर केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या त्या निवेदनावर आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनीदेखील जोरदार टीका केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना केवळ बाहेरील राज्यातील व्यक्तींना दोष का देता, तुमच्या मंत्रिमंडळातील 44 टक्के मंत्री हे विविध गुह्यांमध्ये दोषी आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, त्यांची अगोदर दखल घ्या, असे उपरोधिक पद्धतीने म्हटले आहे.
Previous Articleसरकारकडून मिळणाऱ्या ‘कोटी’मुळे चर्चिलकडून सरकारची भलावण
Next Article ‘मी केंद्रात जाणार या वावड्या’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









