पणजी : गोवा सरकारने व केंद्र सरकारने ज्या भंडारी समाजाच्या चार नेत्यांना ईडीसमोर आणून उभे करून त्यांची जी सामाजिक स्तरावर सतावणूक सुरू केली आहे ती ताबडतोब बंद करावी, अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजपला हे सारे मारक ठरणार असल्याचा इशारा माजी आमदार व भंडारी समाजाचे नेते किरण कांदोळकर यांनी दिला आहे. कांदोळकर यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना सांगितले की, भंडारी समाजाच्या चार नेत्यांना ईडीच्या कार्यालयात उभे केले, यातून आपल्याला सखेदाश्चर्य वाटले. भंडारी समाजाला व त्यांच्या नेत्यांना हा टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अलिकडेच महाशिवरात्री उत्सवादरम्यान भंडारी समाजाच्या कार्यात ज्या पद्धतीने धुसफूस सुरू केली व हस्तक्षेप करण्यात आला तो प्रकार अत्यंत आक्षेपार्ह असल्याचा दावा कांदोळकर यांनी केला. दोन्ही प्रकार हे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाले आहेत. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील, असा इशारा किरण कांदोळीकर यांनी दिला आहे.
Previous Articleजांबावलीच्या शिशिरोत्सवाला प्रारंभ 2 रोजी दामोदराचा गुलालोत्सव
Next Article सोमवारपासून दहावीची परीक्षा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









