खानापूर : नियती फाऊंडेशन खानापूर भाजप युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारे येथील मलप्रभा क्रीडांणावर कित्तूर राणी चन्नम्मा चषक मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 16 मुलींच्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सरकारी हायस्कूल खानापूर हा संघ प्रथम विजेता ठरला. तर उपविजेता ताराराणी जीएफजीसी तर तृतीय खानापूर वारीयर्स हे संघ विजेते ठरले. या विजेत्या संघांना नियती फाऊंडेशनतर्फे 7001, 5000, 3000 ऊपये रोख पारितोषिके देऊन सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. सोनाली सरनोबत, परमपूज्य श्री शांडिल्येश्वर स्वामीजी, आनंद पाटील, बालेश चव्हाणवार, अनिता कोळमस्कर, भीमसेन आगसर, अनुसूया आगसर, विकास वडर उपस्थित होते.
Previous Articleअसोगा रामलिंगेश्वर मंदिराचे थाटात उद्घाटन
Next Article म. ए. समितीतर्फे जांबोटीत जनजागृती फेरी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









