शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळावे म्हणून रासायनिक खतांचा वारेमाप उपयोग ही शेतीची सर्वात मोठी समस्या सांप्रतच्या काळात बनली आहे. यामुळे पहिली काही वर्षे पीक भरघोस आल्यासारखे दिसले तरी जमिनीचा कस झपाटय़ाने कमी होते. जमीनी क्षारपड होतात आणि आठ-दहा वर्षांनंतर 10 टक्के पीक घेणेही दुरापास्त बनते. त्यामुळे जमिनीचा कस टिकवून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा मार्ग म्हणून जैविक शेतीकडे पाहिले जात आहे. मध्यप्रदेशातील जिंद जिल्हय़ातील एक कृषी अधिकारी सुभाष चंद्र यांनी स्वतः या संदर्भात एक उदाहरण सर्वांसाठी घालून दिले आहे. ते स्वतः चार एकरमध्ये जैविक शेती करतात. अशा प्रकारच्या शेतीमुळे कमीत कमी गुंतवणूक करुन जास्तीत जास्त पीक कसे घेता येते, याचा वस्तुपाठ त्यांनी पंचक्रोशीतील शेतकऱयांसाठी घालून दिला आहे. आता त्यांचे अनुकरण अनेक शेतकरी करु लागले आहेत. हे अधिकारी केवळ खुर्चीवर बसून काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱयांच्या शेतांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात. वास्तविक त्यांच्या कामाचे स्वरुप असे नाही. पण त्यांनी कार्यालयीन कामाबरोबर या ‘फील्ड वर्क’ची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली आहे. अहिरका हे गाव त्यांनी यासाठी निवडले आहे. या गावात आता जवळपास सर्व शेती जैविक पद्धतीने केली जाते. यामुळे उत्पादन तर काही प्रमाणात वाढले आहेच, पण गुंतवणुकीचा खर्च मोठय़ा प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱयांचा नफा वाढला आहे. पाच वर्षांमध्ये आपले उत्पन्न दुप्पट झाल्याचा दावा काही शेतकरी करु लागले आहेत. अशा प्रकारे हे अधिकारी लोकांचे खरेखुरे मार्गदर्शक बनले असून त्यांना या भागात मोठा मान दिला जातो.
Previous Articleभारत इजिप्तला पुरवणार गहू
Next Article सलग सुट्टय़ांमुळे नंदनवनाला बहर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









