बेळगाव : गोहत्या विधेयकाला नॅशनल काँग्रेस वर्कर्स कमिटीचा पूर्ण विरोध असून विधानसभा आणि संसदेमध्ये याबद्दल चर्चा केली जावू नये, अशा आशयाचे निवेदन कमिटीच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बैल आणि गोहत्या याला आमचा पूर्ण विरोध आहे. हे विधेयक जैन, लिंगायत, रजपूत, ब्राह्मण आणि समस्त हिंदू यांच्या विरोधात आहे. एकेकाळी काँग्रेस पक्षाचे चिन्ह हे गाय होते. हे लक्षात घेऊन हे विधेयक संमत केले जावू नये. याशिवाय हिंदू संस्प़ृतीमध्ये बैल म्हणजेच वराह हे भगवान शंकराचे वाहन समजले जाते आणि गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात, अशी धारणा आहे. जैन समाजसुद्धा या विधेयकाला विरोध करत आहे. कारण गाय हा पहिले तीर्थंकर आदिनाथ (वृषभनाथ) यांचे प्रतीक आहे. एकेकाळी ब्रिटिशांनी भारतीयांमध्ये फूट पाडण्यासाठी हे विधेयक संमत केले होते. आर्थिकदृष्ट्या गायींची टंचाई ही दूध उत्पादनावर परिणाम करणारी आहे. अनेक औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोमुत्राचाही प्रश्न उद्भवणार आहे. शेतात वापरण्यासाठी गोमुत्राची टंचाई भासणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. शिवाय विधानसभेमध्ये संसदेमध्ये, समाजमाध्यमांवर याची चर्चाही होवू नये, अशी मागणी संजय गोटाडकी, हेमंत लेंगडे, सुजय गोटाडकी यांनी केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल तसेच काँग्रेस पक्षाध्यक्ष व विविध मठांच्या स्वामींना निवेदन देण्यात आले.
Previous Articleगुंजीत समाजभवनाची इमारत कोसळली
Next Article नाथ पै चौक येथे धोकादायक चेंबर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









