बेळगाव : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कांदा मार्केटमधील गटारी तुंबल्याने सांडपाणी वाहून जाणे कठीण झाले होते. त्यामुळे मार्केटमध्येच सांडपाणी तुंबून रहात होते. सांडपाण्यातच बसून भाजी विक्रेत्यांना व्यापार करावा लागत होता. याचा फटका ग्राहकांनादेखील बसत असल्याने नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी पुढाकार घेत सोमवारी बाजारपेठेतील गटारींची मनपाच्या सफाई कामगारांना सफाई करण्यास सांगितले. पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्याची सफाई करण्यात यावी, अशी सूचना मनपा अधिकाऱ्यांना वारंवार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील नाले व गटारींच्या सफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी झालेल्या पावसात विशेष करून कांदा मार्केटमध्ये गुडघाभर पाणी तुंबले होते. सांडपाण्यामुळे भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होण्यासह व्यापारी व ग्रहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे याची दखल घेत नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी मनपाला तातडीने गटारींची सफाई करण्याची सूचना केली होती.
Previous Articleकॅन्टोन्मेंट बसस्थानकातून सेवेचा विस्तार कधी?
Next Article मिलिटरी कँटीनमधील मद्यावर करवाढीचा निर्णय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









