पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ जुलै ते डिसेंबर २०२२ पर्यंत वैध असेल. ही वाढ ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्वीकारलेल्या सूत्रावर आधारित आहे.
सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३४ टक्क्याने महागाई भत्ता दिला जात आहे. परंतु, महागाईचा भडका लक्षात घेता सरकारने त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांवर गेला आहे. या नव्या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात मागील तीन महिन्यांची सर्व थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








