बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील विजयनगर येथे दोन फिरती स्वच्छतागृहे देण्यात आली. या गावामध्ये नैसर्गिक विधीला जाण्यासाठी कोणतीच सोय नाही. त्यामुळे प्रामुख्याने महिलांची अत्यंत गैरसोय होत होती. पहाटे किंवा अंधार पडल्यानंतर त्यांना हे विधी उरकावे लागत होते. हे लक्षात घेऊन लोककल्पने फिरती स्वच्छतागृहे देण्याचे ठरविले. त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी ही फिरती स्वच्छतागृहे देण्यात आली. यामध्ये भारतीय व पाश्चिमात्य (कमोड), वॉशबेसिन, दिवे व पाणी यांची सोय आहे. गावांमध्ये स्वच्छतागृहे व शौचालये उपलब्ध असणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, हे लक्षात घेऊन लोककल्पने ही मदत केली आहे. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोककल्प नेहमीच प्रयत्नशील आहे, असे लोककल्पचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी स्पष्ट केले.
Previous Articleशिवप्रतिष्ठानतर्फे गो-माता पूजन
Next Article जायंट्सतर्फे धनगरवाड्यावर मदत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









