खानापूर : बेकवाड (ता. खानापूर) येथील शेतकरी गुंजाप्पा पाटील या शेतकऱ्याची बैलजोडी बुधवार दि. 16 रोजी बेकवाड येथील तलावामध्ये बुडून मरण पावली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ऐन हंगामाच्या वेळीच अपघाताने बैल दगावल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. याबाबतची माहिती आमदार चन्नराज हट्टीहोळी यांना समजताच त्यांनी हेब्बाळकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गुंजाप्पा पाटील यांना 50 हजारची आर्थिक मदत दिली आहे. मृणाल हेब्बाळकर यांनी सोमवारी आपल्या कार्यकर्त्यासह बेकवाड येथे जाऊन गुंजाप्पा पाटील यांची भेट घेऊन सांत्वन करून धीर दिला. तसेच 50 हजारची रोख मदत गुंजाप्पा पाटील यांच्या हाती सुपूर्द केली. खचून न जाता तातडीने नवी बैलजोडी घेऊन शेतातील काम सुरू करावे, आवश्यकता भासल्यास आणखी आर्थिक मदत करू, असे आश्वासन यावेळी मृणाल हेब्बाळकर यांनी गुंजाप्पा पाटील यांना दिले. यावेळी राजेंद्र कब्बूर, सातेरी बेळवट्टकर, लक्ष्मण कसर्लेकर, इरफान तालीकोटी, महादेव पाटील, यल्लाप्पा गुरव, जोतिबा केसरेकर आणि शेतकरी उपस्थित होते.
Previous Articleकणकुंबी अबकारी खात्याजवळील गतिरोधक धोकादायक
Next Article महापुरात विध्वंस तरीही धडा नाही…
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









