बेळगाव : महिलांना सुरक्षितपणे रेल्वे प्रवास करता यावा, यासाठी ‘मेरी सहेली’ हा उपक्रम नैर्त्रुत्य रेल्वे व आरपीएफ जवानांकडून राबविला जात आहे. नोव्हेंबर 2020 पासून महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे अभियान राबविले जात असून प्रवासादरम्यान महिलांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी सोडविल्या जात आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेने 250 मेरी सहेली संघांची स्थापना केली असून यामध्ये आरपीएफ जवानांची नेमणूक केली आहे. दररोज 500 रेल्वेंमध्ये 13 हजार महिलांची भेट घेऊन त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी मदत करीत आहेत. 2025 मध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या 2 लाख 8 हजार 869 महिलांना या पथकाने मदत केली आहे. सध्या नैर्त्रुत्य रेल्वेमध्ये 10 मेरी सहेली टीम कार्यरत असून त्यामध्ये 25 आरपीएफ जवानांचा समावेश आहे. रेल्वे प्रवासादरम्यान महिलांशी असभ्य वर्तन, छेडछाड यासह इतर प्रकार घडत असतात. हे पूर्णपणे थांबविण्यासाठी सहेली पथकाने अभियान राबविले.एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना कोणत्याही अडचणी आल्या तर त्या त्वरित दूर केल्या जात आहेत. मेरी सेहली या उपक्रमामुळे नैर्त्रुत्य रेल्वेच्या एक्स्प्रेसमधून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी मंजुनाथ कलमाडी यांनी दिली आहे.
Next Article राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये उपचारात्मक अध्यापन योजना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









