वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी 6कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.36 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान रिलायन्स इंडस्ट्रीजचे झाले आहे. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 742 अंकांनी घसरणीत राहिला होता. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी निर्देशांकसुद्धा 202 अंकांनी घसरणीत राहिला होता. दहा कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. दुसरीकडे पाहता टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, स्टेट बँक ऑफ इंडिया, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवलामध्ये वाढ झालेली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या बाजारभांडवलामध्ये 34,710 कोटी रुपयांनी घसरण होत 18,51,174 कोटी रुपयांवर राहिले होते. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 29,722 कोटी रुपयांनी कमी होत 15,14,303 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्य 24,719 कोटी रुपयांनी कमी होत 10,25,495 कोटी रुपयांवर आणि इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 19,504 कोटी रुपयांनी कमी होत 5,91,423 कोटी रुपयांवर राहिले होते.
यांच्या मूल्यात वाढ
एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 17678 कोटींनी वाढत 5,77,187 कोटी रुपयांवर तर टीसीएसचे बाजार मूल्य 11,360 कोटींसह वाढत 10,97,908 कोटी रुपयांवर पोहचले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार मूल्य 9784 कोटी रुपयांच्या वाढीसह 7,42,649 कोटींवर तर बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 186 कोटींनी वाढलेले हेते.









