वार्ताहर/मजगाव
अनगोळ, मजगाव शेतवडीत भातरोपे लागवडीची धांदल सुरू आहे. कारण गेले पंधरा दिवस या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतवडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाल्याने रोप लावणे जोरात सुरू आहे. कामगारांचा तुटवडा भासत असल्याने 25 ते 30 कि.मी. अंतरावरील महिला मजूर अनगोळ-मजगावमध्ये रोज येवून काम करीत आहेत. मजूर महिलांना घेवून येणे आणि सायंकाळी परत पोहोचविणे म्हणजे शेतमालकाला परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी पाऊस समाधानकारक पडल्याने भातरोप लावणे सोयीस्कर झाल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.









