प्रतिनिधी : रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील आंबा व काजू शेतकरी मंगळवार २५ जूलै २०१३ रोजी सकाळी ११वा.जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. आंबा, काजू, फळबागायतदार, शेतकरी, छोटे व्यवसायिक यांची संपूर्ण कर्ज मुक्ती विनाअट, सरसकट झालीच पाहिजे. कोकणातील प्रदूषण कारखाने बंद झालेच पाहिजे. कर्जदार शेतकयांचे ७/१२ चे उतारे कर्जमुक्त झालेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या फळबागायतीचे विम्याचे निकष बदलेच पाहिजे.
सन २०१४-१५ या वर्षापासून २०२३ २४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षांसाठी ४% टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करुन दिले पाहिजे. शेतकऱ्यांचा कृषीपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावे. खते, औषधांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, त्यांचा GST माफ करावा किंवा शेतकऱ्याने खते व औषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदार द्यावे. आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोग शाळा करण्यात यावी.
आंबा बागायतदार, शेतकरी, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या सोबतीने काम करणारे कामगार ( महिला व पुरुष ) यांना जीवन व आरोग्य विमा संरक्षण मिळावे. ( शेतांमध्ये बागांमध्ये काम करत असताना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरुन पडणे, फवारणी करताना विषबाधा, हृदयविकार इ. मुळे मृत्यू आल्यास दोन्ही विमा संरक्षण मिळावे या व इतर प्रश्नांसाठी शेतकऱ्यांमार्फत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे आयोजन कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सह.संस्था रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा सह. संस्था, मंगलमूर्ती आंबा उत्पादक सह. संस्था, आडीवरे, पावस परिसर आंबा सह. संस्था, पावस विभाग, ओबीसी संघर्ष समन्वय समिती, रत्नागिरी- बहुजन विकास आघाडी आदी संस्थांचे पदाधिकारी आंबा बागायतदार शेतकरी यांनी केले आहे.









