मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परीषदेत महाराष्ट्राच्या जनतेला मोठ गिफ्ट दिलं आहे. पेट्रोल-डिझेल दरात कपात केली असून शेतकऱ्यांसाठीही महत्वपूर्ण योजना जाहिर केल्या आहेत. तसेच आरे कारशेडनंतर मविआ सरकाने घेतलेला निर्णय युती सरकारनं बदलला आहे. त्यानुसार आता सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने.
राज्यातील ग्रामपंचायत सरपंचाची थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
Previous Articleभरपावसात विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले, आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार
Next Article राकसकोप जलाशय भरण्याच्या मार्गावर








