बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील सुनावणी बुधवार दि. 12 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या सुनावणीवेळी कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा खंडपीठात समावेश होणार असल्याची शक्यता असल्याने खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. 2004 पासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे सुनावणी होऊ शकलेली नाही. त्यानंतर महाराष्ट्र तसेच कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा समावेश खंडपीठामध्ये होत आहे. यामुळे वारंवार खटल्याची सुनावणी पुढे ढकलली जात आहे. मार्च 28 रोजी देखील कर्नाटकचे न्यायमूर्ती खंडपीठात असल्याने खटला पुढे ढकलण्यात आला. अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांनी वकिलांकडे केली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना न्यायालयीन कामकाजाची माहिती दिली होती. त्यावेळी महाराष्ट्र किंवा कर्नाटकच्या न्यायमूर्तींचा खंडपीठात समावेश असणार नाही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याबाबत सीमाप्रश्नाच्या वकिलांसोबत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.
Previous Articleदक्षिणसाठी 88 जणांची निवड कमिटी
Next Article विजेच्या बिलामध्ये पुन्हा एकदा वाढ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









