महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई ही महाराष्ट्र राज्याची आहे ते “कोणाच्या बापाची नाही” असे म्हणून कर्नाटकातील मंत्र्यांनी दोन राज्यांमधील सीमा विवादाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मंत्री त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अभिमान दुखावत असून महाराष्ट्र सरकारची कोणतीही प्रतिक्रिया नसल्याने खेद व्यक्त केला. “मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची मागणी कर्नाटकचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि कायदामंत्री मधु स्वामी यांनी केली आहे. लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकची असल्याचे सांगून मराठी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे” असेही पवार म्हणाले. तेसच यावक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “मुंबई महाराष्ट्राची आहे…कोणाच्या बापाची नाही. मुंबईवर कोणीही हक्क सांगू शकतो हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही आमच्या भावना कर्नाटक सरकार आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर मांडू.” पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शहा यांना अशा “वाचाळवीरांना” चा फटकारण्याची विनंती केली जाईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








