बेळगाव : मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे कंग्राळ गल्ली येथे घर कोसळल्याची घटना घडली आहे. घराची मुख्य भिंत कोसळल्यामुळे संपूर्ण घरच धोकादायक बनले आहे. बाळू व सुभाष अनंत माने यांना केवळ एका खोलीमध्ये त्यांना जीवन कंठावे लागत आहे. मागील महिन्याभरात बेळगावसह परिसरात धुवाधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी जुनी कौलारू घरे कोसळली. कंग्राळ गल्ली येथे माने कुटुंबीयांच्या वडिलोपार्जित कौलारू घराची मुख्य भिंत कोसळली. यामुळे सर्व माती इतर खोल्यांमध्ये पसरली आहे. भिंत कोसळल्यामुळे या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून उर्वरित घर केव्हा कोसळेल, याचा नेम नाही. माने कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना एकाच खोलीमध्ये जीवन जगावे लागत असल्याने सरकारने या कुटुंबांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.
Previous Articleनिवासी शाळांमधील कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची मागणी
Next Article ऐन गणेशोत्सवात एलअँडटी कर्मचारी वेतनाविना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









