बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील वन परिसरातील ग्रामस्थांना मधमाशांच्या 34 पेट्यांचे दान नुकतेच करण्यात आले. ग्रामीण समुदायाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने लोककल्प फाऊंडेशनने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मधुमक्षिका पालनाद्वारे शुद्ध व सेंद्रिय मधाचे उत्पादन करून उपजीविका करण्यासाठी ग्रामस्थांना साधन उपलब्ध करून देण्याची लोककल्प फाऊंडेशनची ही योजना आहे. यासंबंधी लोककल्प फाऊंडेशनच्या प्रतिनिधीने माहिती दिली. हा प्रकल्प केवळ उत्पन्न मिळविण्यासाठी नाही तर पर्यावरणाचे रक्षण करून कायमस्वरुपी उपजीविका चालविण्यास उपयोगी ठरणार आहे.
Previous Articleलोकमान्य सोसायटी आयोजित दिवाळी किल्ला स्पर्धेचा निकाल
Next Article खासगी बँकांच्या प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









