बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे अबनाळी (ता. खानापूर) येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये मंगळवार दि. 4 सप्टेंबर रोजी टाटा कंपनीचे मोफत वॉटर फिल्टर बसविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी निरोगी आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी हे वॉटर फिल्टर बसविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी शिकण्याचे वातावरण निर्माण होणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सोसायटीच्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील 32 गावांना दत्तक घेण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जीवनावश्यक मूलभूत गरजा, आरोग्य, शिक्षण यांची पूर्तता करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोककल्प फौंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे.
Previous Articleगोगटे ग्रुपच्या ‘शिरीश गार्डन्स’चे उद्घाटन थाटात
Next Article शहापूर परिसरात भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









