बेळगाव : लोककल्प फौंडेशन व हेनकेल आनंद इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गवसे, चिखले, चिगुळे आणि गोल्याळी या गावांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारे पथदीप बसविण्यात आले. तालुक्यापासून दूर व घनदाट जंगलात वसलेल्या या गावांना सूर्यास्तानंतर अंधार, प्रकाशाचा अभाव आणि सुरक्षिततेच्या समस्या यांचा सामना अनेक वर्षांपासून करावा लागत होता. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पथदिपांमुळे गावकऱ्यांना सुरक्षितता, चांगली हालचाल व प्रकाशाची गरज उपलब्धता झाली असून मोठा दिलासा मिळाला आहे. या मौल्यवान योगदानाबद्दल समस्त गावकऱ्यांनी लोककल्प फौंडेशन व हेनकेल इंडिया प्रा. लि.चे मन:पूर्वक आभार मानले आहे. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना जीवनावश्यक आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण समाजाला सशक्त करण्याच्या दिशेने लोककल्प फौंडेशन सातत्याने कार्यरत आहे.
Next Article सांबरा विमानतळामध्ये ‘यात्री सेवा दिवस’ साजरा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









