बेळगाव : लोककल्प फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी या नात्याने खानापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या 32 गावांतील शालेय विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वितरण केले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली लोककल्प फाऊंडेशन या 32 गावात अनेक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दफ्तर देण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनच्या व्यवस्थापक मालिनी बाली, सूरजसिंग राजपूत, प्रसाद असुकर, प्रीतेश पोतेकर, किशोर नाईक, स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे व सुहासिनी पेडणेकर आदी उपस्थित होते. कुसमळी, हुळंद, कापोली, चापोली, हंदीकोपवाडा, चिखले, गवसे, आमगाव, हब्बनहट्टी, कालमणी, कणकुंबी, पारवाड, माण, चिगुळे, बेटणे, चोर्ला, घोसे, गवाळी, नेरसे, आंबोली, दारोली, ओतोली, देवाचीहट्टी व तळवडे या गावांसह अन्य गावांतील शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर देण्यात आले.
Previous Articleशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती
Next Article चर्चा एकच…घोरपड दिसली ..!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









