बेंगळूर : कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात दलितांवर झालेल्या हिंसाचार प्रकरणी 101 पैकी 98 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर तीन आरोपींना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. कोप्पळच्या जिल्हा मुख्य आणि सत्र न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला आहे. 2014 मधील जातीय दंगली प्रकरणी एकूण 101 जणांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यापैकी 98 जणांना जन्मठेप व प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड तसेच इतर तिघांना खुनाचा प्रयत्न, हिंसाचार प्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 2 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 28 ऑगस्ट 2014 रोजी मरकुंबी गावात सवर्ण आणि दलितांमध्ये संघर्ष झाला होता.
Previous Articleगुलमर्गमधील हल्ल्यात दोन जवान हुतात्मा
Next Article कारवारचे आमदार सतीश सैल दोषी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









