बेळगाव : शहापूर पोलीस स्थानकासमोरच जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांतून एलअॅण्डटीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. एकीकडे पाणी वाचवा, असा संदेश दिला जातो तर दुसरीकडे एलअॅण्डटीच्या दुर्लक्षपणामुळेच पाणी वाया जाण्याचे प्रकार समोर येत आहेत. शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाण्याचा अपव्यय होत आहे. शहापूर पोलीस स्थानकासमोर असलेल्या रस्त्यावरच जलवाहिनीला गळती लागल्याने वाहनधारकांचीही कसरत सुरू आहे. मागील वर्षभरापासून पाणी वाया जात आहे. त्यामुळे जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणीही होत आहे.
Previous Articleमनपामध्ये माहिती अधिकार हक्क कायद्यासंदर्भात कार्यशाळा
Next Article स्मार्ट सिटी योजनेतील सायकली-वाहने धूळखात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









